"खरतर आयुष्यात प्रत्येक क्षणी प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागेवर बरोबर असच वागत असते."
एखाद्या क्षणी ती व्यक्ती अशी का वागली आपल्यला तस का बोलली, का रागावली हे जाणण्यासाठी
त्या व्यक्तीच्या जागेवर स्वताला ठेवून बघायचे म्हणजे कस माहितेय त्याच व्यक्तीचे मन उधार घ्यायचे.नाहीतर आपण म्हणजे तो व्यक्ती असं समजून आपण असं वागलो असत तर, सारासार विचार करून झाला की कळत की
मुळात चूक आणि बरोबर अश्या दोन दोन गोष्टी अस्तित्वातच नसतात.
एखादी गोष्ट एखाद्या साठी बरोबर असते तर तीच गोष्ट दुसय्रा साठी चुकीची असते.प्रत्येक जण आपल्या सोयीनं अर्थ घेत असतो
ज्यांना ती गोष्ट चुकीची वाटते अश्या माणसांची संख्या जास्त झाली कि,
आपणच ती गोष्ट "वाईट" म्हणून ठरवून टाकतो." पण कुणी मुद्दाम चुकत नसतो कुणी मुद्दाम बोलत नसतो,परिस्थती ची जागा चुकली की शब्दांचे अर्थ बदलू लागतात, मग कुणी स्वार्थी तर कुणी नालायक ठरतो, पण प्रत्येकाला आपण निस्वार्थी आहोत असच वाटत, हे शब्द म्हणजे नुसते अर्थ असलेले पण यांना स्वतःची ओळख नाही जिकडच पारडं जड तिकडचे ते,मनावरचं पारडं जिकडे झुकेल तिकडं गोड
Friday, August 5, 2016
उधार मन
Subscribe to:
Post Comments (Atom)
खुपच छान...
ReplyDeleteThank you my first reader
ReplyDelete