Friday, August 5, 2016

रात्रपाळी

कॉलेज संपलं की उराशी श्रीमंतीची स्वपने घेऊन अनेक तरुणतरुणी पुण्याची वाट धरतात, पुण्यात job शोधणं तस खूप अवघड समुद्रात रेखीव शिंपला शोधावा तस हे काम,कष्ट तरी घ्यावे लागतातच पण प्रत्येकाला कष्टाचे फळ मिळणे म्हणजे चुकूनच,
पण वेळ लागतो मरणाचा, काहीजण हातपाय गाळून घरी जातात , काही वाईट संगतीने पैसे मिळवत आयुष्याची वाट बिघडवतात ,कुणी छोटासा कसलातरी जॉब करत पैशाची टंचाई भागवत मनात चांगल्या job ची आशा ठेवून नवीन job साठी प्रयत्न करत असतात ,त्यातला मी एकेकाळी असं प्रयत्न करणार तरुण ,
काही दिवस मित्राकडे काढले,एक मिळाला जॉब tech support, घंटा माहित नसलेलं पैशासाठी काढले 6 महिने, खाणंपिणं यात सपंल ते,वेळ वाया नुसता,त्यात nightship, आमचे विचार रात्री job न सकाळी जरा झोपून परत अभ्यास न परत शोधाशोध,इतकं सोपं नसत हे नंतर कळलं, बोलायला काय ओ ,स्वप्ननांची दुनिया,
सर्वजण यावर बोलले, 6 महिन्यातल्या 190 दिवसातले 50 दिवस सूर्य बघितला असेल मी,ते पण घरी गेलेले न सुट्टी चे दिवस पकडून,रात्रीची भीती आता मोडली त्यामुळे, रात्रीच काम करणं खरच सोपं नसत ते पण नेहमी रोज , आयुष्यच भरीत होत असत 5 दिवस काम 2 दिवस अंथरूण, पण मित्र मिळतात खूप सगळेच सारखेच , core field मध्ये काम करायची इच्छा बाळगणारे पण असं कधीच होत नाही,त्यपेक्षा 3 महिने study कर न मग प्रयत्न करणे उत्तम,अश्या वेळी धीर धरता यायला हवा,मार्गदर्शन हवं,

खरतर मला रात्र आवडते ,शांत,धीरगंभीर कुठे दगदग नाही, आवाज नाही,पण हे झालं  स्वतःसाठी , माणसाने रात्र सुद्धा जगावी पण स्वशांतीने, स्वतः साठी
दुसऱ्याची चाकरी करायला नव्हे,

No comments:

Post a Comment