लिहावं कि नाही याबद्दल दुमत होत तस,पण लिहावं वाटत,नुकताच ऑफिस चा ब्रेक झाला,मी थोडा वेळ थांबलो होतो,बाकीचे सगळे निघून गेले होते,मी ऑफिसच्या मजल्यावरून खाली आलो, काही खायचं असं वाटतं नव्हतंच,त्यामुळे थोडा रेंगाळत राहिलो,कुणाला तरी call कारावास वाटलं ,वातावरण छान झालं होतं,ढगाळस काहीतरी, कित्येक दिवसांनी गजबजलेला रस्ता रिकामा वाटत होता, मी तिथेच थोडासा थांबलो,एकांत म्हणून, आज सकाळीच TV वर advertisement पहिली, 15 aug होता उद्या, गरिबांना मदत करताना खूप जण दाखवत होते त्या advertisement मध्ये,विचार आला असं हे 15ऑगस्ट लाच का दाखवतात, पण मला लिहावस वाटलं कारण आज माज्यासोबत असच काहीस घडलं
रेंगाळत असताना एक व्यक्ती माज्याजवळ आली साधारण 28-30 असेल वय,माज्याकडे मदत मागितली, नागपूरचे होते असे म्हणाला तो व्यक्ती,त्यासोबत 6 म्हणजे एकूण 7 जण होते,3 भाऊभाऊ असावेत आणि त्याची बायका, आणि एक वयाची 60 गाठलेली एक म्हातारी,मी खिशात हात टाकला ,पाकिटातून 100 रु ची नोट काढली आणि दिली, जे 100 रु स्वतःच्या कमाईतून होते, ना गर्व वाटला ना अभिमान,पण एक शंका आली हे असे इतक्या दूर कसे आले वगैरे वगैरे, तो म्हणत होता,कामानिमित्त आलेलो काम नाही मिळालं न पैसे संपले आहेत,मला काही विचारावासा सुद्धा वाटलं नाही,त्याची डोळेच काय ते सांगून गेले मला,लाचारी म्हणा किंवा आलेली परिस्थिती ची त्याना लाज वाटत होती ती वाढली असती, त्यातला त्याचा मोठा भाऊ जरा दाढी वाढलेली,म्हणाला साहेबकडून 200 रु तरी घे रे, माज्यासारखा माणूस,आज साहेब झाला,मला वाईट वाटलं म्हणजे वयानं मोठी माणसं मला साहेब म्हणतात,ते हि 100-200 रु साठी, हि कसली बाजू माणसांची, याला काय म्हणावं ,पण असो मला भरून आलं शेवटी ,जाता जाता ती म्हातारी आशीर्वाद असुदे रे म्हणाली, हात वर केला दुरूनच अशिर्वादला,थोडस हास्य उमटले चेहऱ्यावर,पण मला समाधान मात्र वाटलं पैशाचं दिल्याचं नाही, कुठं तरी माझ्यात पण माणुसकी जिवंत आहे म्हणायची,
कुणीतरी म्हटलं आहेच
कुणा गरजू ला मदत करताना त्याच्या डोळ्यात बघू नका,तुम्हाला गर्व होईल,मी मात्र नजरेला नजर न भिडवता परत आलो,याचंच समाधान म्हणा
No comments:
Post a Comment